Namaskar mitrano,
Marathi chat madhe aaple swagat aahe, kahi lokanchi complaint aahe ki tyana chat box disat nahi, tar sarvani lakshadya ki tumchyakade Flash player installed aahe ani tumhi Mozilla Firefox use karat aahe, karan baki sarva browser madhe chat box cha problem aahe.........

Dhanyavad

आय लव्ह यु .............

Posted on Monday, December 28, 2009 by Ajit


आय लव्ह यु
फोन आला त्याचा
मिटींगमध्ये आहे
उशीर होईल
आज
गड्बडीत का होईना
म्हणाला
आय लव्ह यु


पुन्हा फोन आला
आवाज नशीलाच होता
बाजुला खिदळान्य़ाचा आवाज आला
बोलला काय बोलला
ऐकुच आले नाही
बहुतेक
शेजारी कानात सांगत होता
आय लव्ह यु


पुन्हा पुन्हा तेच भास
पुन्हा तोच आवाजa
प्रेत्येक वेळेस
परकेपणा वाढत होता
परकेपणात ही
आपलेपणा दाखवायला
ढोंगी म्हणत होता
मला
आय लव्ह यु


कल्पी

स्पर्धा करतो हा मी वा-याशी

Posted on Wednesday, December 23, 2009 by Ajit


यमक, प्रास जरी जुळत नव्हते
नियम तेव्हा हे छळत नव्हते
किती पाहिल्या किती वाचल्या
तुझ्या कविता होत्या "आपल्या"

पहिलीच ती सुरूवात होती
शब्दात तुझ्या नई बात होती
पाहिली न होती दुनिया अजूनी
इथलाच दिवस आणि रात होती

कसे कुठे तुझे शब्द ग फिरले
दिले गेले ते शब्द का विरले
फिरले विरले ते मनात जिरले
शब्द तुझ्या कवितेत न उरले

फिरून आलो मग बाहेर मी ही
खुशाल खेळलो लय तालाशी
कशास पचवू फुसक्या गमजा
स्पर्धा करतो हा मी वा-याशी


Kiran

अस माझ प्रेम असाव ..

Posted on by Ajit


जगाच्या दूर ,
एका प्रेम नगरीत ,
आपल छोट एक घर असाव ,
अस माझ प्रेम असाव ...

तू माझी रोज वाट पहावी ,
आणि मी हळूच येवून ,
तुला मिठीत घ्याव ,
अस माझ प्रेम असाव ...

मी उशिरा का आलो म्हणून रुसाव ,
मी मग तास तास तुला मनावाव,
आणि मग हळूच तू हसून द्याव ,
अस माझ प्रेम असाव ...

प्रेमाच्या नभा खाली ,
प्रेमाच्या धर्तीवर ,
प्रेमात रंगलेलो फक्त दोघे असावेत ,
अस माझ प्रेम असाव ...

प्रेमाच्या वर्षेत ,
चीम्भं भिजून ,
दोघे आनंदात गाणे गावेत ,
अस माझ प्रेम असाव ...

तुला उदास बघून ,
माझे अश्रू पहिले निघावेत ,
अस माझ प्रेम असाव ...

जीवनाच्या प्रत्येक क्षणात ,
तुझ्या सुखासाठी मी झटाव,
अस माझ प्रेम असाव ...

आपल्या चहू बाजूनी प्रेम , प्रेम आणि फक्त प्रेमाचा वास असावा ,
अशी ती नागरी असावी , अस माझ प्रेम असाव ...

$uMe$h

सगळीकडून कोसळतय आभाळ एकटेपणाचे

Posted on Tuesday, December 15, 2009 by Ajit


सगळीकडून कोसळतय
आभाळ एकटेपणाचे
अन ते दडलेत
झाडाआड
अजाणतेपणाची झूल पांघरून,
मी उदासगीत गात
प्रकाशकवडसे टिपत
रस्ता कापतो
जावून येऊन
काय त्या सावलीची सोबत.

तसं सारं शरीरच
भेगाळलयं
उन्मादी लस स्त्रवतेयं
सगळीकडून,
झाडत जाणारे सारे अवयव
अन
मनाने खचलेला मी
सारं सारं सामावून जाव ह्या
कराल अंधारात
अन जाणीव उरावी
काही नसण्याची.

तिनं देलेला डाग
आजही चरचरतो मनात
जेव्हा काहूर उठते
फेसाळण्याचे,
ती ढसाढसा रडलीपण होती
मला पदराआड घेवून
कुशीत असून नसल्याचं
ते एकटेपण
आजही उठवते झोपेतून,
घामेजला मी
दचकून पांघरुणात शिरतो,
आजूबाजूला कुणीच नसतं
ती सुध्दा.

विजयकुमार.........
०९.१२.२००९, मुंबई

कुणीतरी अचानक आयुष्यात येतं

Posted on Monday, December 14, 2009 by Ajit


कुणीतरी अचानक आयुष्यात येतं
परक असूनही आपलसं होऊन जातं

खुप काही सांगयचं असतं खुप काही बोलयचं असतं
शब्दच फुटत नाही , सर्व काही मौनातच घडतं..
कुणीतरी अचानक आयुष्यात येतं

ह्रदयच्या कोप-यात त्याच नाव कोरल जातं
प्रत्येक क्षणी मन त्यालाच शोधत राहतं

त्याचा वाटेवर मन रोखु पहातं
सावली बनुन त्याच्या सोबत रहावस वाटतं
कुणीतरी अचानक आयुष्यात येतं

कळी प्रमाणे मन दपु पहातं
नजरेत मात्र गुलाबचे फुल उमलुन जातं
कुणीतरी अचानक आयुष्यात येतं
आणि आयुष्यच बनुन जातं
खरचं का; कोणी अचानक आयुष्यात येतं...???

ते पण एक वय असतं

Posted on Thursday, December 3, 2009 by Ajit


ते पण एक वय असतं

दिवसभर पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं

ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं

ते पण एक वय असतं
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं आणि तरीही
त्यांच्याशी बोलायला लाजायचं

ते पण एक वय असतं
घरी खोटं बोलून पिक्चरला जायचं
आवाज म्युट करून रात्री एफटीव्ही पहायचं

ते पण एक वय असतं
तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं
तिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं

ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत B.E.ची स्वप्नं पहायचं

ते पण एक वय असतं
लग्नाच्या 'डोमिनियन स्टेटस' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचं
आई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं

ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर जागायचं
शेअर मार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना नाचवायचं

ते पण एक वय असतं
आपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवायचं
त्यांच्या साठी स्थळ शोधताना आपलं तारूण्य आठवायचं

ते पण एक वय असतं
सगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्यावर गॅलरीत पाय पसरून बसण्याचं
आभाळाकडे पाहत फक्त यमाच्या निर्देशाची वाट पाहत बसण्याचं

तो...

Posted on Tuesday, November 17, 2009 by Ajit


अचानक एक दिवस
वार्यावर त्याचे शब्द
"आठवन येते तुझी,
भेटशिल ना एकदा?"

मीही नकळत बोलले
"येउन तरी बघ
धावत येइन तुझ्याकडे"

माझी आणि त्याची मैत्री
अशिच.. एका पावसाळ्यातिल
मला आवडायच भिजायला
आणि त्यालाभिजवायला

त्याची वाट पाहत
माझी रात्र सरली
सकाळी कोंदलेल्या आभाळाने
आगमनाची ग्वाही दिली

मी जरा आगाउच
छत्री घेउन भेटायला गेले
तो ही... माझाच मित्र
छत्रीच उडवुन दिली

बरसणारा तो
रस्त्यात उभी मी
पाण्याच्या लोटात
त्याला शोधनारी

वार्यावर त्याचे शब्द
"आठवन येते तुझी"
अन एक भाबडा प्रयत्न
माझ्या अश्रुना थेंबात समेटन्याचा

अमृता
११-११-०९

तुला काहीच कसं वाटत नह्व्त ...........

Posted on Sunday, November 15, 2009 by Ajit


तुला काहीच कसं वाटत नह्व्त ...........


तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
कधी मी जिंकावं म्हणून तुला एकदा तरी हरताना पाह्यचं होतं

तुझ्या वाटेवर शिणलेल्या त्या डोळ्यांना
माझ्या आठ्व्हनिनी तुझ्या डोळ्यात पाणी पाह्यचं होतं

तुला नुसतं त्या हिरव्या शालूत पाह्यचं नह्व्त
तर तुझ्या हातावर काढलेल्या म्हेन्दीत माझं नाव शोधायचं होतं

तुझ्या हातात भरलेला हिरव्या चुडया सोबत
तुझ्या कपाळी माझ्या नावचं कुंकू लेह्लेलं पाह्यचं होतं

चार चौघात तुला माझी म्हणून मिरवायचं नह्व्त
तर महाबळेश्वरच्या त्या गुलबी थंडीत हि फिरवायचं होतं

सगळच जर एकतर्फी असतं तर काहीच वाटलं नसतं
पण तेव्हा तुला माझ्या जीवाशी खेळताना काहीच कसं वाटत नह्व्त
काहीच कसं वाटत नह्व्त .......................


Sandeep

तेव्हा तुझी आठवण येते ....

Posted on by Ajit


कोणत्या मधुर रात्रि जेव्हा कोनी सोबत नसते ,
तेव्हा तुझी आठवण येते ...
आकाशात जेव्हा एकट्या चंद्राला बघत असतो ,
तेव्हा तुझी आठवण येते ...
जेव्हा कोणती कविता मनात येते त्याच्या पहिला शब्द तू असते ,
तेव्हा तुझी आठवण येते ...
कोण्या सायंकाळी एकटे फिरत असताना मन जेव्हा उदास होते ,
तेव्हा तुझी आठवण येते ...
रात्रि झोपताना जेव्हा विचार करतो ,
तेव्हा तुझी आठवण येते ...
आरश्यात जेव्हा स्वताहाचा चेहरा बघतो तेव्हा ,
तेव्हा तुझी आठवण येते ...
मित्रांच्या गर्दित जेव्हा माला एकटेसे वाटते ,
तेव्हा तुझी आठवण येते ...
जेव्हा मी माझ्या आयुष्यातले प्रत्येक क्षण मोजतो ,
तेव्हा तुझी आठवण येते ...
स्वपनाताही तुझीच आठवण येते ,
जेवातानाही तुझीच आठवण येते ,
बोलतानाही तुझीच आठवण येते ,
गर्दीतही तुझीच आठवण येते ,
एक क्षण जेव्हा संपतो , तेव्हा तुझी आठवण येते ...!!


SuMeSh...

वळुन पाहिले प्रत्येक वळणावर

Posted on Wednesday, November 11, 2009 by Ajit


वळुन पाहिले प्रत्येक वळणावर
कधी तरी तुझी साद येईल...
ना वाटले कधी प्रेम तुझे
इतक्या लवकर कच खाईल...

ना केली मी पर्वा स्व:ताची ,
ना मला तमा या जगाची...
तुझ्या सहवासात आयुष्य जावं
हीच एक इच्छा मज वेडीची...

तु मात्र कधी जाणली नाहीस
किंम्मत त्या प्रेमाची...
मायेच्या नात्यांपुढे जळु दिलीस
स्वप्न आपल्या प्रीतीची..

सांभाळु ना शकलास तु
नात्यांचा हा डोलारा...
ना उरले हाती माझ्या काही,
विस्कटत गेला डाव सारा...

अजुनही वेड्यागत मी
तुझ्यावर प्रेम करते...
सहवासातले क्षण सोबतीला
आयुष्याची नाव हाकते..

जाणते आता कधीच न येणार
तुझी ती प्रेमळ साद...
पण शेवटच्या श्वासापर्यंत असेल
तुझ्या आठवणींशी संवाद...



prashant

तुझी आठवण .......अजुनही ताजी आहे

Posted on Friday, October 16, 2009 by Ajit


तुझी आठवण .......अजुनही ताजी आहे
दीप आहे ..प्रकाश आहे........गारठलेली रात्र आहे
माझ्या मनात तुझी आठवण .......अजुनही ताजी आहे

शीतल हवेत आसवाना
ओलावा मिळत नाही
आठवांची उजळणी करताना
मनाला उसंत नाही

दीप आहे ..प्रकाश आहे........गारठलेली रात्र आहे
माझ्या मनात तुझी आठवण .......अजुनही ताजी आहे

दीपोत्सव उलथुन जातो
अंधाराला प्रकाश देतो
प्रकाशाला कहानी आपली
हळूच सांगुन जातो

दीप आहे ..प्रकाश आहे........गारठलेली रात्र आहे
माझ्या मनात तुझी आठवण .......अजुनही ताजी आहे

कहानीत प्रत्येक वेळी
अश्रुनांच जाग येते
थिजलेल्या डोळ्यात अजुन
कासावीस प्राण आहे

कल्पी जोशी १६/१०/२००९

दिवाळी

Posted on by Ajit





टींबाची रांगोळी घालायची दारात
रंग भरुन सजवली थाटात
मनाची कवाडं उघडा झोकात
दिवाळीचा आनंद घ्या तालात



दिव्यांची रोशनाई उजळली मनात
नाही अंधार कुणाच्या दारात
लक्ष्मीची पाउलं उमटली घरात
भरभराट झाली सर्वांच्या ह्रुदयात


समाधान सुख ्दिव्यांच्या रांगेत
मनाचा संतोष डोळ्यांच्या ज्योतित
आकाशदिवा तरंगतो बघा आभाळात
इंद्रधनुचे रंग आमच्या काळजात


कल्पी जोशी १६/१०/२००९

आठवणीतल्या आठवणी

Posted on Friday, October 2, 2009 by Ajit


कामतीच्या रस्त्यावरची
धूळ उडवत तू शहराकडे
निघालीस
चवथ्या बाळान्तपणासाठी,
मी टाहो फोडला
तुझ्याशिवाय
असा एकटा कधी राहिलो
नव्हतो गं !
तुही भरल्या डोळ्यांनी
मागे मागे पहात
जड झालेली पावले
धुळीत
रुतावत चालू लागलीस ....

ढेकळांच्या काळ्या
रानात मी उष्ण आश्रू
गाळत होतो
अन् तू
धुळवाट ओली करत
अस्पष्ठ होत
राहीलीस....

तेव्हापासून तुला
जडलेला अस्पष्ठतेचा
शाप
तू कधीच सोडला
नाहीस....

बाप तुझ्या तोंडावर
दहाच्या तीन नोटा
फेकून देशांतारास
गेला
तू मात्र चार पिल्ले
कुशीत घेवून
सारवलेल्या जमिनीचे
पोपडे निरखू लागलीस !

कधी म्हणाली होतीस
बापाने रुखवतात
कुंकवाचा करंडा दिला
नाही !
म्हणून चिमटीतले
कुंकू हवेत पसरते
कधीतरी मग कुंकवाआडचे
मेण दिसते
हिरवट....

आज त्याचा अर्थ लागतो आहे .......

विजयकुमार.............

१६.०९.२००९ ,मुंबई

एकदा प्रेम करून बघायचंय.....

Posted on Wednesday, September 30, 2009 by Ajit


प्रेमाच्या सोनेरी हसऱ्या क्षणांना, मला एकदा अनुभवायचं
हसत प्रेम करता करता तिच्याशी थोड भांडायचंय .................

फुल तिला हवे म्हणून, झाडावर मला चढायचंय
पडशील अरे हळूच , अस ओठातुन त्या ऐकायचं ..................

परीराणीला माझ्या , गाडीवरून फिरवायचंय
जोरात गाडी चालवून , थोडास घाबरवायचं...........................

थेटर मध्ये मला, सोबत तिच्या बसायचंय
फिल्म ठेऊन बाजूला , तिलाच मनसोक्त पहायचंय.................

दिवस रात्र बोलून ,ब्यालंसला तिच्या संपवायचंय
गुपचूप रीचारज करून, माहितच नाही मला अस दाखवायचंय....

तिच्या प्रेमळ कुशीत ,मन मोकळं करायचंय
दुखाना तिच्या सर्व , आपलंसं करायचंय ...........................

कोवळ्या तिच्या पावलान खाली, फुलांना मखमली पसरवायचंय
सर्व सुखांना विश्वातील , तिला आणून द्यायचंय ...................

आघाव पण केला तर , प्रेमळ पणे रागवायचंय
चढलाच राग नाकावर तर गोड गोड बोलून समजवायचंय.........

तिच्या नाजूक भावनांना मला सर्वस्वी जपायचंय
येत नसताना जोक सांगून थोडासा तिला हसवायचंय ............

अभिनंदन गायकवाड 14-08-09..

किती दिवस झाले मी तिचं तोंड नाही पाहिलं.

Posted on Monday, September 28, 2009 by Ajit


आज माझ्या प्रेमाला वर्ष पूर्ण झालं ;
काय सांगू तुम्हाला ...
किती दिवस झाले मी तिचं तोंड नाही पाहिलं..!!!!!!

जेव्हा पण भेटायची मला , तीच कालीज भरून यायच ,
तासन-तास आम्ही फ़क्त एकमेकांनाच पहायच,
मग डोळ्यातील समुद्राला उधाण भरून यायच,
डोळे सोडून-काठ मोडून ,अश्रु बनुन वहायच,
खुप दिवस झाले ते पाणी नाही वाहिलं..||१||

माझी आठवण आली की ती मला फ़ोन करायची,
मग माझ्या तोंडातील प्रत्येक शब्दासाठी झुरायची,
बोलता बोलता अचानक हमसून रडायची,
आणि मलाही स्वतःची भ्रांत पडायची,
अजुन बोलायच होत जे दुःख मनात राहीलं..||२||

मला बघताना ती डोळे मिटून घ्यायची,
का म्हणुन विचारल्यावर एकच उत्तर द्यायची,
"तुला माझ्या डोळ्यामधे साठवून ठेवयाचय ",
असं म्हणुन स्वतःच सैरभैर व्हायची,
तिच्या आठवनिंनी मला खुप खुप त्राहिलं..||३||

तिच्या डोळ्यातील अधीरतेची कारण जेव्हा कळली,
प्रत्येक अवघड कोड्याची उत्तरं तेव्हा जुळली,
'तुझी वाट बघेन , भेटू पुढच्या जन्मी ',
असं बोलून तिची प्राण ज्योत मावळली,
याच हातांनी महिन्यापूर्वी तीच शरीर दाहिलं..||४||

=========विक्रम वाडकर=========

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये

Posted on Sunday, September 20, 2009 by Ajit


कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे

स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे

कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी

कुणाची इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी

कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे ' मी पण ' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावे

पण, पण
कुणाच्या इतक्याही दूर जावू नये
की आपल्या सावली शिवाय सोबत काहीच असु नये.

एक दिवस असा होता की

Posted on Thursday, September 3, 2009 by Ajit


एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं

एक प्रेयसी पाहिजे

Posted on Monday, August 10, 2009 by Ajit


एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.

एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.

आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही!!!!!!!!!

Posted on Monday, July 20, 2009 by Ajit


आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही!!!!!!!!!
कीतीही सुदर मुलगी दीसली तरी,
तीची स्तुती करुन तीला
हरबरयाच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणाच्या मागे शीट्ट्यामारत फीरण
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणी जर आवड्लीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

दुसरयाचे वीचार ऎकत असतांना
आपले वीचार मांडण्याचि संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कधी हीमत करुन कोणाला जर वीचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटीनीकधी बघीतलेच नाही
या व्यतीरीक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मीळाले नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणीत आम्हाल कधी समजलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही
बरयाच सुदर फुलां मधे वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दीसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कुणीतरी आठवण काढतंय

Posted on Thursday, July 16, 2009 by Ajit


हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही


रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही



मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही


जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय...

कॉलेज लाइफ़ माझं

Posted on Tuesday, July 14, 2009 by Ajit


कॉलेज लाइफ़ माझं "
कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !

कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !

परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !

पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.

अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!

पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती !!!!!!

तुझा विचार करताना

Posted on Saturday, July 4, 2009 by Ajit


तुझा विचार करताना
मी कधी घड्याळ बघत नाही ,
कारण काटे फिरताना दिसतात ...
पण वेळेच भानच उरत नाही ......


तुझा विचार करताना
मी कधी मुकी रडत नाही ,
कारण आसवाताही तूच दिसतेस ...
अन मग डोळ्यात आसुच उरत नाही ......


तुझा विचार करताना
मी कधी हलके लाजत नाही,
कारण गालावर लाली चढ़ते...
अन मग माझच सुख मला सोसत नाही ......


तुझा विचार करताना
मी कधी तुझी वाट बघत नाही ,
कारण सगळी कड़े तूच असतेस ...
क्षितिजा पर्यंत जाणारा दूसरा रस्ताच दिसत नाही ......


तुझा विचार करताना
मी कधी हरत नाही ,
कारण तुझा विचार केल्यावर ...
मी माझाच मुळी उरत नाही .............

पुन्हा ते दिवस येतील का ग ?

Posted on Thursday, June 18, 2009 by Ajit


पुन्हा ते दिवस येतील का ग ?
तुज्या माज्या भिजन्याचे..........
हातात हात घालून पाउसभर फिरन्याचे........
मुसळधार पाउस कसा गान गात यायचा !
तुज्या माज्या सकट सर्वाना अंगभर भिजवायाचा !!१!!
पुन्हा ते दिवस येतील का ग ?
तुज्या माज्या भिजन्याचे..........
हातात हात घालून पाउसभर फिरन्याचे........
आपण दोघ फिरत रहायचो एकाच छत्रीत.....
अन पाउस मधेच घुसायचा तुज्या माज्या मैत्रीत !
मला थोडा राग यायचा ,त्याच्या घुसन्या न छात्रित ,
अंग अंग भिजवायाचा बोचर्या थंडित !
तरिसुध्हा त्याच घुसन मला आवदायाच !
कारन........
कारन माज्या सकट तुलाही तो अंगभर भिजवायाचा !
थाराथारनारा तुजा हात आणखी घट्ट व्हायचा ,
अन चिम्ब भिजलेल तुज रूप माज्या डोळ्यात साठावयाचा !!२!!
पुन्हा ते दिवस येतील का ग ?
तुज्या माज्या भिजन्याचे..........
हातात हात घालून पाउसभर फिरन्याचे........
मग आपण चहा घ्यायचो गरम टपरीवर !
वाफालानारा चहा आणि तुज्या गालावरून ओघलनारा पाउस मला धुंद करुन जायचा !!३!!
पुन्हा ते दिवस येतील का ग ?
तुज्या माज्या भिजन्याचे..........
हातात हात घालून पाउसभर फिरन्याचे........

पडायच असत प्रेमात कधी कधी

Posted on Tuesday, June 9, 2009 by Ajit


या सुंदर जीवनात कधी कधी..

पडायच असत प्रेमात कधी कधी

बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी..

पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत

विचारात गुंतल्यासारख कधी कधी

अन पाहताना तिच्याकडेच

विचारात गुंतायच असत कधी कधी..

रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच…

जागुन अशी रात्र काढावी कधी कधी

नंतर “जागली होतिस का रात्री?”

म्हणून विचारावे कधी कधी..

मागायचा असतो देवाकडे..

हात तिचा चोरुन कधी कधी

द्यायच असत आश्वासन त्यालाही

पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी..

चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या

विषय तिचा निघाल्यावर कधी कधी

असते रागवायचे लटकेच

“अस काही नाहिये” म्हणून कधी कधी

विरहात तीच्या …

असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी..

पाहुन हात तिचा दुसर्‍या हाती ..

असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी..

पडायच असत प्रेमात कधी कधी

बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी ………………….

न सुचलेली कविता !!

Posted on Sunday, May 24, 2009 by Ajit


प्रतिभेचे देणे कोटी योजने दूर...
सरस्वतीचा वरदहस्त माझ्यावरून फारसा फिरत नाही.
लिहिण्याचे भाग्य तर सोडा,..
कविता मला फारशी समजत देखील नाही!

ओलाचिंब पाऊस खिडकीत कोरडा राहून बघतो मी.....
सकाळचे कोरडे उन देखील छत्रीखालून झेलतो मी...
अरसिकतेवर चिडून माझ्या , वारा चौफेर उधळतो पाने...
वादळ मनात कितीही उठले , तरी होत नाही त्याचे गाणे.
जाणवते आत आत ,खोलवर खूप काही.....
पण कागदावर मात्र काहीच उतरत नाही!
लिहिण्याचे भाग्य तर सोडा,..
कविता मला फारशी समजत देखील नाही!

मैफिल कितीही रंगो ...शब्दांचे जाम भरून फक्त पितो मी..
चढते शब्दांचीच नशा ..त्यात शब्दांनाच शोधतो मी...
अबोल आणि धुंद मनाला , देतो हलके मंद मंद हेलकावे..
जरा घसरतो मीच कुठेतरी..आणि उडून जातात शब्दांचे रावे.
अव्यक्त उस्फुर्त मनाची होते लाही लाही...
पण कागदावर मात्र काहीच उतरत नाही!
लिहिण्याचे भाग्य तर सोडा,..
कविता मला फारशी समजत देखील नाही!

तोच चंद्र अन त्याच चांदण्या ,रोज रोज पाहतो मी..
बागेतल्या लाजरीलाही गुलाबाबरोबरच पाणी घालतो मी!
उसन्या अवधानाने, जगतो जीवनाचे ह्या सोहळे...
चुरगळून, फाडून फेकतो अव्यक्त भावनांचे बोळे !
स्मरणाची नकोशी नोंद ..अन विसरण्याची केवढी ही घाई..
पण कागदावर मात्र काहीच उतरत नाही!
लिहिण्याचे भाग्य तर सोडा,..
कविता मला फारशी समजत देखील नाही!

नशीब एवढेच की कळत नसली तरी, कविता वेड्यासारखी जगतो मी..
.कवितेचं अजीर्ण झालं की, कविताच औषध म्हणून पितो मी!
क्षणात सुचले कवीला जे ते युगायुगानी मला समजते...
सुचल्या काव्याची वेदना रात्रंदिवस मला छ्ळते..
हुरहूर लागे मनाला नी उगाच झरते शाई..
पण कागदावर मात्र काहीच उतरत नाही!
लिहिण्याचे भाग्य तर सोडा,..
कविता मला फारशी समजत देखील नाही!
... गौरी

!! आई !!

Posted on Thursday, May 7, 2009 by Ajit


आई तुझ्या कुशीत, पून्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते ॥

कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटी
तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते ॥

कोळून प्यायलो मी, सुख दुःख सारे
माते तुझ्या विरहास, न प्यावेसे वाटते ॥

कित्येक रात्री, ऐश्वर्यात लोळलो मी
अखेरच्या क्षणाला, तुझ्या कुशीत निजावेसे वाटते ॥

दगडातला तो देवही,आता नवसाविना पावेना
निस्वार्थ हृदय माऊली, तुलाच पूजावेसे वाटते ॥

असेन जर मजला, मानव जन्म कधी
आई तुझ्याच पोटी, पून्हा जन्मावेसे वाटते ॥

कोसळणाऱ्या त्या चिंब पावसात

Posted on Friday, April 24, 2009 by Ajit


कोसळणाऱ्या त्या चिंब पावसात
:
रात्र बरीच झाली होती
पाऊसही कोसळत होता
झालो क्षणातच एकरूप आम्ही
कोसळणाऱ्या त्या चिंब पावसात....
:
खुप समजावले मी तिला
नको भिजुस या क्षणाला
एकायचेच नव्हते तिला माझे
कोसळणाऱ्या त्या चिंब पावसात....
:
राहिलो एकटाच आडोशाला उभा
पण पाहत होतो मी फक्त तिलाच
भर पडत होती तिच्या सौंदर्यात
कोसळणाऱ्या त्या चिंब पावसात....
:
अशाच साठवून ठेवीन तुझ्या आठवणी
मी माझ्या स्वप्नांच्या डायरीत
तू आणि मी एकत्र असताना
कोसळणाऱ्या त्या चिंब पावसात....
:
--हरिष मांडवकर
२४-४-२००९.

कोल्हापूर- नाद नाही करायचा...

Posted on Friday, April 10, 2009 by Ajit



रस्त्यावर पडलं कुणी चुकून तर अजुनही लोक उचलायला धावतात,
आणि आपली कितीही सुंदर असली तरी आम्हाला महाद्वारच्याच पोरी भावतात

मर्दानी शस्त्र आणि मर्दानी खेळ घराघरात जपले जातात,
अरे चौकातुन तर सोडाच पण महापालिकेतही त्याची प्रात्यक्षिके होतात

'गोकुळ' कितीही स्वस्त झालं तरी 'कट्यावरच' गर्दी असेल,
आणि तांबड्या पांढ-या रश्श्यावरती पिळदार मिशी तुटून पडेल

'थेम्स' च्या काठी बसलो तरी 'रंकाळ्याचीच' आठवण असेल,
'रॅप' कितीही ऐकले तरी 'लावणी' ऐकुनच मान डुलेल

'केक- पेस्ट्रीज'कितीही खा, त्याला इथल्या गुळाची चव नाही,
आणि 'आडिडास' च्या शूजला इथल्या 'पायताणाची' सर नाही

अरे कितीही मोठे झालो तरी तोंडात झणझणीत शिवी असेल,
आणि फाडफाड इंग्रजी बोललो तरी रांगडी कोल्हापुरीच हवी असेल

'क्रिकेट- फुटबोल' काहीही येवो 'कुस्तीचा' मान त्याला नाही,
आणि इंग्लंडच्या लंडनलाही 'कोल्हापूर'ची शान नाही

तुझे नि माझे नाते.. !

Posted on by Ajit


तुझे नि माझे नाते कसले?.. मजला उमगत नाही..
या जन्मीचे की गत जन्मीचे?.. काही समजत नाही...

काय नाव मी देऊ याला? सखे तुला तरी कळेल का?
गूढ-गहन प्रश्नाचे उत्तर.. सांग कधि ग मिळेल का ?

अवचित एका वळणावरती.. गाठ आपुली ही पड्ली...
निमिषा मध्ये क्षणाक्षणाची.. रेशीमनाती बघ जुळली..

सत्य प्रेम.. शिव ही प्रेम.. प्रेमच सुंदर आहे..
क्षणीक नश्वर जगती अंति.. प्रेमच अमर आहे....

प्रीत असे या अवनी वरती.. कोरिव सुंदर लेणे..
शिल्पी याचा ईश्वर.. हे तर.. परमेषाचे देणे...

त्याच्या मर्जी शिवाय जगती.. पान ही हालत नाही..
त्याच्या इच्छेपुढ्ती आपुले.. काही चालत नाही...

दुःख- वेदना क्षणाक्षणाला.. देऊन नियति जरि हसते...
तिच्याच करणी मध्ये खरे तर..भलेच आपुले परि असते..

नात्या मध्ये आपुल्या राणी.. अवचित आता मज कळते...
गूढ -गहन प्रश्नाचे कोडे.. अलगद-भरभर उलगडते..

चांगलं-वाईट, चुक-बरोबर? कशाला प्रश्नात पडायचे..
तुझ्या नि माझ्या सहवासाच्या.. क्षणाक्षणाला.. जपायचे..

अश्रूंना ही एक अस्तित्त्व असते ना..!

Posted on Tuesday, March 31, 2009 by Ajit


पुन्हा येशील तू आंब्याच्या झाडाखाली..
बुंध्याला टेकून बसशील
माझ्या आवडीची
मोरपंखी साडी नेसली असशील...
मी म्हणेन मनात
अजूनही छान दिसतेस.

रखरखीत उन्हात
आंबा तुझ्यावर गार गार छत्री धरेल..
तू असशील हरवलेली..विस्कटलेली
मी आणलेली पर्स.. मनालीहून,
तुझ्या हृदयाशी घट्ट धरलेली असेल
हळूच तू ती पर्स उघडशील..
त्यात असतील काही पत्रे..
ओलेत्या शब्दांनी लिहिलेली
काही फोटो...तुला मला धरून ठेवणारे
काही आठवणींची शिल्पे..
कायमची हृदयावर कोरले्ली
आखूडशिंगी पाऊस अचानक सुरू झालेला असेल


कुठूनसे अचानक वारे वाहतील
तुझ्या हातातील कागद उडून जातील
तुला धरायचे असतील ते सारे..
पण
पायात त्राण नसेल तुझ्या..
व्हीलचेअरकडे पाहतांना तुझे
डोळे भरून येतील
टपो-या शिडकाव्याचे
अरबीअश्वाच्या शुभ्र झुपकेदार शेपटासारख्या
मुसळधार पावसात रूपांतर झालेले असेल..

तुझे अश्रू त्यात मिसळून जातील..
पाऊस पाहून हरखणारा मी..
निखळलेले मोती वेचायचा प्रयत्न करीत असेन..

मलाही तेव्हां मग
अश्रू ढाळायचे असतील..

पण....पण..
अश्रूंना ही एक अस्तित्त्व असते ना..!

आणि

अश्रू ढाळायला ही हवे असते ना....!!

मित्राणो प्रेम करू नका प्रयत्न करा

Posted on Sunday, March 22, 2009 by Ajit


मित्राणो प्रेम करू नका प्रयत्न करा
कारण प्रेमात हो किंवा नाही असते
प्रयत्नात ही नाहीतर ती असते
ती मिळाली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण सुंदर दिसते

मित्राणो मागणी घालू नका प्रपोज़ मारा
कारण मागणी नंतर एकतर पती श्रीराम नाहीतर राम राम
प्रोप्से मधे लवरशिप मिळाली तर ठीक
नाहीतर फ्रेंडशिपतर असतेच असते
फ्रेंडशिप मधे काही दिवसानी का होईना पोरगी फसते
ती मिळाली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण सुंदर दिसते

मित्राणो मूलीना सीरियस घेऊ नका टाइम पास करा
सिरियस व्हाल तर हमखास मराल
टाइम पास कराल तर राहाल ऑल टाइम सुखी
भेटली तर पा रो नाहीतर चंद्र मुखी
शेवटी पा रो आणि चंद्र मुखी कोणीच कायमची नसते
ती मिळाली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण सुंदर दिसते

एकच कांन मंत्र पाळा मित्राणो
जय देवी जय देवी जय बायको
तू सांगेल ते ते मी आयको
जग म्हणेल काय बायकोचा चमचा आहे
सांगा जगाला तो प्रश्‍न आमचा आहे
शेवटी बायकोच आपल्याला आयुष्य भर सोसते
मित्राणो बायको फक्त आपलीच बायको चांगली असते

ओळख

Posted on Saturday, March 21, 2009 by Ajit


हात धर हातात
अन चेहर्‍याकडे बघ
दिसेल एका डोळ्यात
तरंगणारा ढग

दुसरा डोळा गप्पगप्प
दुसरीकडे वळेल
अर्थ लावू नकोस
आपॊआपच कळेल

कितीक चिन्हं चेहर्‍यावर
येऊन जाऊन असतात
शब्दांवर विसंबणारे
सहजासहजी फ़सतात

चल उगी, तुझी वाट
तुझं वळण, तुझा घाट
तुझ्या मागे मागे येतील
आठवणींचे धागे सात

गुंतू नकोस
गुंफ़ू नकोस
हरवू नकोस
हरूही नकोस

समजेल त्याला कधीतरी
अर्थ तुझ्या मौनाचाही
मागेल तोही हात तुझा
बोलत राहील काहीबाही

हात धर हातात
अन चेहर्‍याकडे बघ
दिसतील दोन्ही डोळ्यांत
कोसळणारे ढग

आयुष्य खूप सुंदर आहे

Posted on Friday, March 13, 2009 by Ajit


आयुष्य खूप सुंदर आहे,
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी

होळीचा साजना करुन बहाणा...

Posted on Tuesday, March 10, 2009 by Ajit


रंगात तुझ्या रंगून राजसा ओली मी झाले अशी
होळीचा साजना करुन बहाणा किती मला भिजवीशी
.
हातात तुझ्या ती पिचकारी, अन डोळ्यात आगळे भाव
विरोधा माझ्या न जुमानता, तू अचूक साधीशी डाव
साडी ओली केस ही ओले, ओले अंग प्रत्यंग करीशी
होळीचा साजना करुन बहाणा किती मला भिजवीशी ||1||
.
चकवून गेले तुला साजना, अन परसदारी मी पळाले
पाठी येता शोधीत मजला, आपसूक एकांती तुला मिळाले
पिचकारी मग भिरकाऊनी, जवळ ओढूनी मजला घेशी
होळीचा साजना करुन बहाणा किती मला भिजवीशी ||2||
.
अंग ओले परी श्वास गरम, अन बाहूत तुझ्या मी आले
रंगात तुझ्या रंगता सख्या रे, बेभान होऊनी मी गेले
नको नको ना पुरे आता रे, किती तू धसमूसळा होशी
होळीचा साजना करुन बहाणा किती मला भिजवीशी ||3||
.
वस्त्रे गळता राहीले रंग बस, अन अंगास अंगे मिळाली
सरून जाता आवेग सख़्या रे, भासे मोक्ष-मुक्ती मिळाली
आत्मा अंग अन मोहमाया रंग, सख्या रे ईश्वर तू असशी
होळीचा साजना करुन बहाणा किती मला भिजवीशी ||4||

प्रेमीकांचे जेंव्हा लागते लग्न

Posted on Friday, March 6, 2009 by Ajit


प्रेमीकांचे जेंव्हा लागते लग्न
प्रेमात येऊ लागतात विघ्न

कोणाचंच फारसं चुकत नसतं
पण काहीतरी नकळत बिनसतं

चंद्र-तारकांचे होतात कांदे-बटाटे
दिसु लागतात फुलांमधले काटे

लाडिक हट्टांच्या अपेक्षा होतात
ओझी वहाण्याच्या शिक्षा होतात

प्रेमपत्रांची होतात वाण्याचि बिलं
नाही कळत,संगीत कुठं हरवलं?

लग्नापुर्वी सोडेना तो तिची पाठ
आता माहेरी जाण्याचि पाहे वाट

पुर्वी जपायची ती त्याचि आवड
आता कामांमध्ये कुठली सवड?

हे सगळं असुन लग्न होतातच
सगळे प्रेमीक हा लाडु खातातच

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....

Posted on Monday, March 2, 2009 by Ajit


मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

आज इथे उद्या तिथे.........कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

[शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात

मराठी दिनाच्या हार्दिक शुब्ब्हेचा

Posted on Thursday, February 26, 2009 by Ajit


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढया जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफूलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

प्रेम म्हणजे काय रे

Posted on Sunday, February 22, 2009 by Ajit


प्रेम म्हणजे काय रे

प्रेम म्हणजे काय रे
दुधावरची साय रे
आपुलकीची ऊब मिळता
सहज उतू जाय रे...

प्रेम म्हणजे गात रहाणं
आनंदाचं गोड गाणं
प्रेम म्हणजे पोर्णिमेच्या
चांदण्यामध्ये बेभान होणं...

प्रेम म्हणजे झुळझुळ झरा
प्रेम म्हणजे अवखळ वारा
प्रेम म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या श्रावणधारा...

प्रेम म्हणजे हळवं गीत
प्रेम म्हणजे व्याकुळ प्रीत
प्रेम म्हणजे कुर्बानीची
जगावेगळी न्यारी रीत...

प्रेम म्हणजे असून नसणं
प्रेम म्हणजे नसून असणं
प्रेम म्हणजे स्वतःपासून
स्वतःलाच हरवून बसणं....

प्रेम म्हणजे काय रे
दुधावरची साय रे
आपुलकीची ऊब मिळता
सहज उतू जाय रे....


|